Kolhapur : गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बस कोल्हापूरजवळ उलटून भीषण अपघात; पुण्यातील तिघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड येथील पुईखडी येथे रात्री सव्वा (  Kolhapur) दोनच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या व्ही.आर.एल. कंपनीच्या खाजगी स्लीपर बसचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातात पुण्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून  चौघेजण जखमी आहेत. जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  मृत्यूमुखी झालेले  तिघेही एकाच कुटुंबातील आहेत.तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित 16 प्रवासी सुखरूप आहेत.

या बसमध्ये तब्बल 25 प्रवासी प्रवास करत होते. रात्री सव्वादोनच्या सुमारास ही बस राधानगरी येथील पुईखडी येथे आली असता यावेळी येथे असलेल्या वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटली. या बाबतची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.

Pune : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

दरम्यान, महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. या अपघातात चार प्रवासी बसखाली अडकल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या अपघातात पुण्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण जखमी आहेत .

नीलू गौतम  ( वय 43), रिधिमा गौतम ( वय 17) , सार्थक गौतम (वय 13) ( सर्व राहणार पुणे) अशी मृतांची नावे आहेत.  दरम्यान, जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित 16 प्रवासी हे सुखरूप (  Kolhapur) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.