Pimpri : पाणी कपातीची टांगती तलवार ; पवना धरणात फक्त 18 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या (Pimpri) पवना धरणातील पाणीसाठा 18.76 टक्‍यांवर आला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शहरवासियांवर पाणी कपातीची टांगती तलवार निर्माण झाली असून महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग 30 जूनपर्यंत पावसाची प्रतिक्षा करणार आहे. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर पाणी कपाती संदर्भात गांभीर्याने विचार करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात दोन हजार 777 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते.

पवना धरणात सध्या 18.76 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी पुरवठा सुरू झाला असून टप्प्या-टप्प्याने आणखी 50 एमएलडी पाणी देण्यात येणार आहे.

Pune : जी-20 परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी पवना धरण परिसरात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आत्तापर्यंत पावसाचा फक्त शिडकाव झाला आहे. सध्या पावसाचे वातावरण होत आहे. मात्र, पाऊस काही पडत नाही.

पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला चिंता सतावू लागली आहे. 22 जूननंतर मान्सून सक्रीय होईल, असे हवामान खात्याने सांगितले होते.

मात्र, पावसाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे 30 जूनपर्यंत धरण परिसरात पावसाला सुरूवात झाली नाही. तर, जुलैमध्ये पाणी कपातीच्या नियोजनासंदर्भात आयुक्तांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी (Pimpri)  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.