Pimpri News : सह्याद्री साहित्य पुरस्कारांची घोषणा

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या ‘सह्याद्री साहित्य पुरस्कारांची’ घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निवडक साहित्यकृतींची यासाठी निवड करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी राजेंद्र वाघ, सुरेश कंक, रंगनाथ गोडगे पाटील यांच्या समितीने ही निवड केली आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाईल, अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली.

पुरस्कारासाठी निवड झालेली पुस्तके आणि त्यांचे लेखक

– गांधी समजून घेताना ( लेखक- डॉ. जगदीश कदम, नांदेड)

– वीजेने चोरलेले दिवस ( लेखक- संतोष जगताप, सांगोला)

– शैलीकार यशवंतराव ( लेखक- प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख, उस्मानाबाद )

– लॉकडाऊन (डॉ. श्रीकांत पाटील, इचलकरंजी )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.