Pimpri: रिक्षा चालकांना सक्षम, स्वाभिमानी, निर्भय बनविण्यासाठी संपर्क अभियान अन् सह्यांची मोहीम

एमपीसी न्यूज – मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, रिक्षा चालकांचे कर्ज माफ झाले झाले पाहिजे, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झालेच पाहिजे, ओला उबेरसह महाराष्ट्रातील बेकायदेशीर वाहतूक बंद झालीच पाहिजेत, रिक्षा चालक मालकांना घरकुल मिळालेच पाहिजे अशा विविध मागण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने 15 ते 30 जानेवारी 2020 पुणे शहरात सह्यांची मोहिम राबवली जात आहे.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क अभियान आणि सह्यांची मोहिम राबवली जात आहे. रिक्षा चालकांच्या सर्व्हेचा फॉर्म भरून नुकतेच या अभियानाची सुरुवात करण्यात आली. रिक्षा चालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी विशेष रथ तयार करण्यात आला आहे. संपर्क अभियान रिक्षा चालकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडचणी समजुन घेतल्या जाणार आहेत. रिक्षाभाडेवाढीबाबत रिक्षा चालकांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर रिक्षा चालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा चालकांचे सर्वेक्षण फॉर्म देखील यावेळी भरले जाणार आहेत.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वरिष्ठ उपाध्यक्ष रिक्षा चालकांचे ज्येष्ठ नेते आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, पुणे रिक्षा फेडरेशचे बाबा शिंदे, बाप्पू भावे, प्रदीप भालेराव, शिवाजीनगर रिक्षा संघटनेचे दत्ता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेचे बाप्पू धुमाळ, प्रदीप रवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जाणार आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष नितिन शिंदे, पुणे शहर अध्यक्ष सदाशिव पवार, प्रदेश संघटक लखन लोंढे, प्रफुल शुक्ला अनिल पाटोळे, सागर धर्मे, गोविंद पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.