Pimpri : रेटून खोटे बोलणा-यांना मतदारच योग्य तो धडा देतील – मुनाफ हकीम

एमपीसी न्यूज – ‘खोटे बोला पण, रेटून बोला’ ही भाषा फक्त सत्ताधाऱ्यांनाच शोंहून दिसते. सत्ताधा-यांनी गेल्या पाच वर्षात कोणतीही विकासकामे केली नाही. खोटी आश्वासने देणारा पक्ष आता नकोय, असा टोला  राज्य अल्पसंख्याक आयोग व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुनाफ हकीम यांनी  लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार व शिरुर मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मुनाफ हकीम यांनी प्रचारासाठी दौरा सुरु केला आहे. दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्येक ठिकाणी संघटनांत्मक सूचनांचे पालन करण्यात येत आहे. बैठकांवर सध्या जोर देण्यात येत आहे. असे ते म्हणाले.
  •  ‘जनतेचा कौल महत्वाचा आहे. जनतेच्या निर्णयापुढे सर्व गोष्टी गौण असतात. सध्या भाजपचे नेते बिनबुडाचे आरोप करत फिरत आहेत.  गेल्या पाच वर्षांत एकाही आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. फक्त खोट्या आश्वासनांचा पाऊस त्यांनी पाडला अशी टीका त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.