राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल- संजय राऊत

एमपीसी न्यूज – देशाचं नेतृत्व कोणीही करू शकतो. या देशात लोकशाही आहे. मात्र, राहुल गांधी यांनी स्वत: पंतप्रधान बनायचं नाही, असं सांगितलं आहे. पण लोकांना वाटलं तर राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल ,असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी(एमपीसी न्यूज) आज केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार संजय राऊत हे जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. जम्मूमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Alandi News : राष्ट्रीय चालक एकता महामंचाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले

 

यावेळी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसशिवाय कोणतीच आघाडी यशस्वी होऊ शकत नाही. या देशात आजही काँग्रेसचं अस्तित्व आहे, हे विसरून चालणार नाही. आज काँग्रेसकडे खासदारांची संख्या कमी आहे. मात्र, 2024 मध्ये नक्कीच हे चित्र बदलेल.तसेच काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारलाही लक्ष्य केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.