Rajgurunagar : जरांगे पाटील यांच्या सभेदरम्यान तरुणाचा स्टेजवर गोंधळ

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Rajgurunagar) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटील शुक्रवारी (दि. 20) राजगुरूनगर येथे आले असता सभा संपल्यानंतर एका तरुणाने स्टेजवर येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

जालना येथील सुनील कावळे या तरुणाने मुंबई येथे गुरुवारी (दि. 19) आत्महत्या केली. या तरुणाला तसेच मराठा आंदोलनादरम्यान 47 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द देत मनोज जरांगे पाटील यांनी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले.

Pune : जिल्ह्यातील विहीरींमधील पाणीपातळी पाच वर्षाच्या तुलनेत सव्वा मीटरने खाली

त्यानुसार सभा संपल्यानंतर सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभे राहिले असताना एक तरुण अचानक स्टेजवर आला. (Rajgurunagar) त्याने आपल्याला बोलायचे आहे, असा आग्रह केला. मात्र सभा संपल्याने आयोजकांनी त्याला बोलू दिले नाही. त्यावरून त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी संबंधित तरुणाची समजूत काढून त्याला स्टेजवरून खाली नेले.

जरांगे पाटील म्हणाले, ” त्या तरुणाची समजूत काढली आहे. त्यांना बोलायचे होते, पण नियोजित कार्यक्रमात बोलता आले नाही. त्यांचे मनपरिवर्तन झाले आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लागावे हेच सरकारला हवे आहे. पण कोणीही गोंधळ करू नये.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.