Maharashtra : जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा माझ्याकडे आला नाही; जयंत पाटील यांचा खुलासा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून (Maharashtra) शरद पवार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय काल घेतला. त्यानंतर राज्यभरामधून अनेकांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. पण, मला जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याबाबत माहिती नसून ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

Shrirang Barne : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ची श्रीरंग बारणे गुरुवारी करणार पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.