Akurdi : सावरकर चौकातील सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत महाविद्यालयाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील लोकमान्य हॉस्पिटलकडे दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सिग्नल बंद पडला (Akurdi ) आहे. एक आठवड्याचा कालावधी उलटूनही सिग्नल दुरुस्त करण्यात आला नाही. यामुळे चौकात वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांचा संभ्रम वाढत आहे.

.Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

खंडोबा माळ चौकातून आकुर्डी गावठाण मार्गे प्राधिकरणात जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व पादचारी या चौकातून रस्ता ओलांडत असतात.

सिग्नल बंद असल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत आहेत. बेशिस्त वाहन चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसही चौकात उपस्थित नाहीत.

काही वाहनचालक थांबावे की पुढे जावे याच संभ्रमात आहेत.

बेशिस्त वाहतूक आणि वाहतूक कोंडी यामुळे हा सिग्नल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात (Akurdi ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.