Chinchwad Bye-Election: भाजप, राष्ट्रवादी पक्ष चिंचवडकरांना दररोज पाणी देवू शकले नाहीत – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत 15 वर्षे (Chinchwad Bye-Election) आणि भाजपची 5 वर्षे सत्ता असताना दोनही पक्ष चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे हे स्पष्ट होते, अशी टीका अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी केले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी चिन्हावर लढत असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबाबत आदर आहे. चिंचवड मतदारसंघ 13 वर्षे जगताप यांच्या ताब्यात होता. पण, या 13 वर्षाच्या कालावधीत चिंचवडचा सर्वांगीण विकास झाला नाही.

Pune Crime : पिस्टल बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

मतदारसंघातील उपनगरे विकासापासून वंचित आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. मागील पाच वर्षे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना विकास कामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुनच भाजप जास्त चर्चेत राहिला. भाजपने टक्केवारीच्या राजकारणापायी शहराची विभागणी केली. या विभागणीमुळे शहर (Chinchwad Bye-Election) मागे पडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्षे महापालिकेत सत्तेत होता. 15 वर्षे सत्ता असताना शहरातील पाण्याचे नियोजन करता आले नाही. शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही. भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले. मागील पालिका निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला नाकारले होते.

विरोधात असताना राष्ट्रवादीने कोणते प्रकरण तडीस लावले नाही. आताचे राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिकेत विरोधी पक्षनेते असताना सभागृहात किती वेळा बोलले, हा संशोधनाचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि भाजपला वाढत्या लोकसंख्येनुसार शहराचा विकास करता आला नाही.

शहर विकासाचे नियोजन केले नाही. या दोनही पक्षांमुळे शहर विकासात मागे पडत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत जनता आपल्यासारख्या उच्चशिक्षित उमेदवाराच्या पाठिशी उभी राहिल असा ठाम विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.