Pune : पुण्यात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावे लागले – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुण्यात काँग्रेसला शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळत नव्हता पण शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असा दावा पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.

ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. आज चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गिरीश बापट यांनी काँग्रेसकडून पुण्याच्या उमेदवारीबाबत झालेल्या दिरंगाईवर भाष्य केले.

ते म्हणाले की, शेवटचा दिवस उजाडला तरी पुणे मतदासंघासाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असा दावा बापट यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शिरूर मतदारसंघात आमचे मित्र विलास लांडे या बुवा माणसाला राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी फसवले आहे. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांना निवडणुका लागल्या की, आजारपण येते असा टोला बापट यांनी लगावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.