Talegaon : नवलाख उंब्रे येथे कृषी अधिका-यांकडून भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्रनाथ ढगे व कर्मचा-यांकडून तळेगाव दाभाडेतील नवलाख उंब्रे शेटेवस्ती, चावसरवस्ती, कदमवाडी, कोयतेवस्ती येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे आज पंचनामे करण्यात आले.  

यामध्ये भात पिक सडणे व इतर नुकसानी संबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांकडून आधार कार्ड, बँक पासबुक प्रत व पंचनामा अर्ज कृषी अधिकारी प्रियंका पाटील भरून घेत आहेत. ज्या शेतकरी बंधूंच्या शेतातील भात पिकांचे नुकसान झालेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष नुकसान दाखवून अर्ज भरून दयावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मावळ देवेंद्रनाथ ढगे यांनी केले आहे. तसेच शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पी एस पाटील कृषी अधिकारी, नवलाख उंबरेचे माजी सरपंच एकनाथ शेटे, इंदाराम शेटे, विजय शेटे, सागर एकनाथ शेटे, ज्ञानेश्वर शेटे, महेश शेटे, संतोष शेटे सर, विक्रम शेटे, रामनाथ शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर शेटे, बाबाजी शेटे, राहूल शेटे, दिलीप शेटे आदी व सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भात पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.