Jammu Kashmir : पाकिस्तानी विमानांनी ओलांडली भारताची हवाई हद्द ; बॉम्ब टाकल्याची शक्यता
एमपीसी न्यूज- पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करीत भारताच्या हद्दीमध्ये जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात प्रवेश केला. मात्र भारतीय हवाई दलाने या विमानाना तत्काळ पिटाळून लावले. या विमानांनी बॉम्ब टाकल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सीमेवरील वाढत्या हालचाली लक्षात घेता जम्मू आणि काश्मीरमधील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराचे एक लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिकांच्या मृत्यू झाला. या विमानाने श्रीनगर विमानतळावरून उड्डाण केले होते. काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान जम्मू काश्मीरच्या कलान गावात कोसळले. तथापि हे विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानी हवाईदलाकडून करण्यात येत आहे.