Kasaba : वापरा आणि सोडून द्या या नितीमुळे भाजपचा पराभव – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : कसब्यात भाजपच्या झालेल्या पराभवावर (Kasaba) आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रहार केला आहे. वापरा आणि फेकून द्या या नीतीने भाजपचा पराभव झाल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे.

कसब्यात 28 वर्षांनंतर भाजपचा पराभव झाला. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हंटले, की जर कसबा एवढ्या वर्षांनंतर बाहेर पडू शकतो तर देश का नाही? काँग्रेस जिंकल्याचा आंनद आहे. तसेच, भाजपला जोपर्यंत गरज होती तोपर्यंत त्यांनी वापर केला. तर याच भाजपने टिळकांचा देखील वापर केला आणि आता सोडून दिले. गिरीश बापट यांचा फोटो पाहिला असता त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून आणले (Kasaba) होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे देखील असेल केले, त्यांच्या मुलाला संधी दिली नव्हती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Supreme Court hearing : सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 14 मार्चला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.