Maharashtra : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

एमपीसी न्यूज – दिवसें-दिवस राज्याचे तापमान वाढत ( Maharashtra) आहे. सोमवारी (दि.25)  अकोल्यात सर्वांधिक 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राजस्थान आणि गुजरातमधील आद्रतायुक्त उष्ण वारे गुजरातमार्गे महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरून मध्य महाराष्ट्रापर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत किनारपट्टीवर तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Pimpri : ‘शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा गुरुवारी शुभारंभ

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात कमाल – किमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अकोल्यासह अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे 40 किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने तापमानात वाढ होण्याचा अंदाज या पूर्वीच दिला होता. तसेच पुढील तीन ते चार दिवस ही वाढ कायम राहण्याचा अंदाज ( Maharashtra) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.