Mumbai News : वारीमधील महिलांना सॅनिटरी नॅपकिन,स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा पुरविणार;ठाकरे सरकारचा निर्णय
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने आषाढी आणि कार्तिकी वारीदरम्यान महिला वारकर्यांना स्वच्छता आणि सुरक्षेकरीता नवे आदेश प्रसिध्द केले आहेत. यानुसार आता वारी काळात दर दहा ते 20 किलोमीटर अंतरावर महिला वारकरी यांच्यासाठी शौचालय आणि न्हाहणी घराची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडींग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन असणे गरजेचे असल्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या या पत्रकात याबाबत निर्देश वारी मार्गक्रमण करते त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृध्द सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलिकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होतात. या वारकर्यांमध्ये सहभागी होणार्या महिलांची संख्या लक्षणिय असते.
सुविधा काय देणार
- वारी काळात दर दहा ते 20 कि.मी.अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था
- सॅनिटरी नॅपकिन वेडींग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन असणे आवश्यक
- स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी
- महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरातील दर्शनी भागात लावावेत