Mumbai : लवकरच महायुद्ध होण्याचा ‘या’ अभिनेत्याने वर्तवला अंदाज

एमपीसी न्यूज : करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अशातच आपल्या बेताल बडबडीमुळे कायम प्रकाशझोतात राहण्याची हौस असणारा अभिनेता कमाल आर खानने ‘मला असे वाटते की आता लवकरच महायुद्ध होणार आहे’ असे सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोरोनाच्या भीतीने  दररोज सकाळी उठले की आजचा आकडा काय असेल बरं, हाच प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो. भारतातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 52 हजार 952 वर पोहचली आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश देताना दिसत आहे.

कमाल खानने पुढे लिहिले आहे की, ‘मला नाही माहित का? पण मला असे वाटते की लवकरच महायुद्ध होणार आहे. जगाचा विनाश होणार आहे.’ त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कमाल आर खान नेहमी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखला जातो. तो बऱ्याच वेळा बिनधास्तपणे त्याचे मत मांडत असतो. अनेकदा सामाजिक विषयांवर मत मांडल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

‘देशद्रोही’ या चित्रपटातून कमाल खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो बिग बॉस ३ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आला होता. तो एक स्वयंघोषित चित्रपट व्यापार विश्लेषक म्हणून देखील ओळखला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.