Navale Bridge : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलविण्यात यावी – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : मुंबई- बंगलूरू हायवेवरील नवले ब्रिज (Navale Bridge) येथील रस्ते सुरक्षेच्या उपायोजनांबाबत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे.

मुंबई- बंगलूरू हायवेवरील नवले ब्रिज येथील रस्ते सुरक्षेच्या उपायोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी पत्रामध्ये केली आहे.

Pune : राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हद्दीतील अतिक्रमण काढण्याचे आवाहन

रविवारी रात्री नवले पुल आणि स्वामीनारायण मंदिर परिसरात (Navale Bridge)दोन मोठे अपघात झाले होते. सुप्रिया सुळे यांनी अपघात भेट देऊन पाहणी केली व अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची त्यांची विचारपूसही केली. त्यानंतर आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

पत्रामध्ये सुळे म्हणतात की, मुंबई बंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून यासंदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात त्या वेळोवेळी बैठकीद्वारे तसेच पत्र व्यवहार करून पाठपुरावा करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवले पुन्हा अपघाताचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. त्या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्विस रस्त्याची कामे करणे महामार्गावरील पंक्चर बंद करणे अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपायोजना ही सुचविल्या आहेत.

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा 80 वरून कमी करून 40 प्रतितास करण्यात यावी, तसेच त्याचे फरक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत, तसेच विविध ठिकाणी रंबल स्ट्रीप, सोलर ब्लींकर देखील लावण्यात यावेत, कर्म पेंडिंग करावे वाहन चालकांना डोन्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लो, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा अशा सूचना देणारे फलक लावण्यात यावेत. यासारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाययोजना तातडीने पूर्ण होणे बाबत कारवाई होण्याबाबत मागणी केली होती. स्वामीनारायण मंदिर ते वडगाव पुल असा पूल बांधणे आवश्यक आहे, अशी ही मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच नवले पूल परिसरात 20 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा व अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी विनंती केली आहे की रस्ते सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी. तसेच सदर बैठकीचे नियमित आयोजन करून रस्ते सुरक्षेच्या समस्या मार्गी लावण्याबाबत आढावा घेऊन सूचनांनुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

https://youtu.be/Ii_UhPFbjDo

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.