Osmanabad News : आमदार सुजितसिंह ठाकूर यांची अतिवृष्टी बाधीत गावांना भेट

एमपीसी न्यूज – जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे अशातच परंडा तालुक्यातील सोनगिरी, देवगांवसह आवारपिंपरी, गावातील नद्यांना पूर आला. त्यामुळे शेतजमीनी वाहून गेल्या व नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी काल (दि.15 ऑक्टो.) रोजी सोनगिरी, देवगांव, आवारपिंपरी या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून जाणून घेतल्या.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिक वाहुन गेली होती. या अतिवृष्टीमुळे उरलीसुरलेली पिकेही वाहून जाऊन शेतजमीनीचे खूपच नुकसान झाले आहे, यामुळे शासनाकडे पंचनाम्याची अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे, असे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, राजाभाऊ चौधरी, उमाकांत गोरे, दादा गुडे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे आदीसह अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सोनगीरी, खासगांव, वडनेर – देवगांव, आवारपिंपरी गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.