Pimpri : लोकसभा निवडणुकीत बदल घडविणे तुमच्या हातात -अजित पवार

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत बदल घडविण्याचे तुमच्या हातात आहे. तुम्ही बदल घडवून आघाडीची सत्ता आल्यानंतर सर्व प्रश्न सोडवून सुरक्षित वातावरण निर्माण करु, असे आश्वासन आज अजित पवार यांनी दिले.

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानिमित्त पार्थ अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार अण्णा बनसोडे, मंगला कदम, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, “गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने नोटाबंदी, जीएसटी, महागाई, आर्थिक शिस्तीच्या नावाखाली नागरिकांचे शोषण तसेच दोन वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील केलेल्या भ्रष्टाचारामुळे नागरिक नाराज झाले. सर्वसामान्य नागरिकांना दररोज कचरा, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यात भाजपचे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ पारदर्शक कारभाराच्या चिंध्या उडाल्या आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.