Alandi : शरद पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : – चऱ्होली येथील मुक्ताई लॉन्स मध्ये भागवत वारकरी महासंघ आयोजित (Alandi) एकदिवसीय राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या हस्ते सन्मानीय सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच वारकरी वैष्णव संप्रदाय या ग्रंथाचे व आजादी सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (Alandi) केले. ते आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आणि संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Chikhali : निलेश नेवाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

शरद पवार म्हणाले, आगळ वेगळं प्रकारचं असे संमेलन या ठिकाणी आयोजित केल. त्याचे मानसिक(Alandi) समाधान तुम्हा आम्हाला प्रत्येकाला मिळालं.

भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे. चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्यासाठी त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जो काही पर्याय समाजासमोर आहे त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनाचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत.

आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो.

या ठिकाणी माझ्याअगोदर अनेकांचे विचार आपण ऐकले. त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. हा देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटनकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाणे मांडली जाते.

त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणं, ते शक्तिशाली करणे आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो, असे शरद पवार म्हणाले.

आज सबंध देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असते. मी एकच गोष्ट सांगतो, आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे, समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे, देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. ती विचारधारा जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले.

यावेळी ह भ प दिनकर शास्त्री भुकेले, माजी आमदार विलास लांडे, प्रकाश म्हस्के, बबनराव कुऱ्हाडे, तुषार कामठे, विकास लवांडे, शामसुंदर महाराज सोन्नर, सतीश काळे ,प्रियांका चौधरी तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.