Alandi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रस्सीने बांधून गावातून फिरवले; पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मिळून तरुणाला रस्सीने बांधून गावातील चौकाचौकातून फिरवले. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी साडेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू गावात घडली.

नागेश गुलचंद सूर्यवंशी (वय 23, रा. सोळू, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोमनाथ प्रकाश पाटोळे, दीपक प्रकाश पाटोळे आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि नागेश यांचे मागील दीड महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी नागेश यांना घरात गाठले. त्यांनी ‘तू सोळू गावाचा भाई आहे काय?, तुला सोळू गावातच फिरवतो’ असे म्हणून नागेश यांचे दोन्ही हात पाठीमागे रस्सीने बांधून गावातील चौकाचौकातून फिरवले.

यामुळे नागेश यांची मानहानी झाली. तसेच आरोपींनी नागेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.