Water hyacinth: गणेश तलावातील जलपर्णी काढण्याची मागणी
एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण मधील गणपती विसर्जन घाट गणेश तलावामधे मोठ्या प्रमाणता जलपर्णी वाढली आहे. ( Water hyacinth) वाढलेल्या जलपर्णीमुळे तलावाच्या आजूबाजुच्या परिसरात मच्छरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे तलावातील जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष निखिल दळवी यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात दळवी यांनी म्हटले आहे की, गणेश तलावाची नित्यनियमाने स्वच्छता होत नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णीमुळे तलावात पाणी आहे की नाही हे देखील समजून येत नाही. संपूर्ण गणेश तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी परसली आहे. येत्या सेप्टेंबर महिन्यात म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे. गणेश तलाव येथे ही विसर्जन घाट आहे. दर वर्षी परिसरातील लाखो भाविक आपले गणपती विसर्जन करण्यास गणेश तलाव येथे येत असतात. हे पाहता त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. (Water hyacinth)
अनंत चतुर्दशी अगोदर गणेश तलावातील जलपर्णी काढून तलाव स्वच्छ करावा. जलपर्णीमुळे परिसरात होणारे मच्छर, दुर्गंधीचाही परिसरातील नागरिकांना त्रास सहन करवा लागत आहे. त्यामुळे गणेश तलावा मधील जलपर्णी व साठलेली घाण लवकरात लवकर काढावी व गणेश तलाव स्वच्छ करावे अशी मागणी करण्यात आली आहे.