Devendra Fadnavis: नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर होणारच-देवेंद्र फडणवीस

एमपीसीन्यूज -आज अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. अहमदनगर (Devendra Fadnavis)लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा घेण्यात आली होती.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधीत केले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगर शहराचे नाव (Devendra Fadnavis)अहिल्यानगर होणारच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी जाहीर सभा 

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे “अहिल्यानगर” मध्ये स्वागत करतो. 2014 आणि 2019 ला याच मैदानावर मोदींची सभा झाली होती. त्यापेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावेळी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय झालाय. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की, त्यांच्या आशिर्वादाने लवकर जिल्ह्याचे नाव “अहिल्यानगर” होईल.

ते पुढे म्हणाले,निळवंडे धरणातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे. नगर जिल्ह्याला देशातील 4 महामार्ग जोडले आहेत. जिल्ह्यात 4 एमआयडीसी होणार आहेत. मोदींच्या आशिर्वादाने जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा म्हणून होईल. येत्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.