Hinjawadi : जमिनीच्या वादातून पती-पत्नीवर खूनी हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण करत, डोक्‍यात दगड घालून खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी म्हाळुंगे येथे घडली.

दत्तात्रय वामन पाडाळे, कुंदा दत्तात्रय पाडाळे, सायली दत्तात्रय पाडाळे, तन्मय दत्तात्रय पाडाळे आणि दिगंबर जगन्नाथ पिंगळे (सर्व रा. म्हाळुंगे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. योगेश रखमाजी पाडाळे (वय 25, रा. म्हाळुंगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी दत्तात्रय हे फिर्यादी यांचे चुलते आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी योगेश यांनी आपल्या घरासमोरील राडारोडा कामगारांकडून काढून अमोल मोहोळ यांच्या सहमतीने त्यांच्या जागेत टाकत होते. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून बेकायदा जमाव जमवून फिर्यादी योगेश करीत असल्याच्या कामाचा राग येऊन फिर्यादी यांचे आई-वडिल यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी तसेच लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

तसेच फिर्यादींचे वडिल रखमाजी यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची आई यांचा हात फॅक्‍चर केला. तसेच घरातील इतरांनाही दुखापत केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.