Alandi : आळंदीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वराज ग्रुप तर्फे भव्य रक्तदान : 307 रक्तदात्यांनी केले रक्तदान
एमपीसी न्यूज – आळंदी देवाची येथे देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त( दि.15 काल) स्वराज ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
अविरत 16 वर्षे गरजूंना रक्त मिळवून देण्यासाठी स्वराज ग्रुप रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. असे यावेळी स्वराज ग्रुप चे अध्यक्ष आशिष गोगावले यांनी सांगितले. या रक्तदान शिबिरास सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यात प्रामुख्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी पोलिस स्टेशन चे मुख्य पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे , आळंदी पोलिस स्टेशन अधिकारी मच्छिंद्र शेंडे , माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा, जेष्ठ शिवसेना नेते तालुकाप्रमुख उत्तम गोगावले, संभाजी कुऱ्हाडे पा, खेड कृषिउत्पन्न बाजार समिती सदस्य सोमनाथ भाऊ मुंगसे पा, माजी नगरसेविका विनया ताई तापकीर , आनंदराव मुंगसे, रमेश गोगावले, डॉ आदित्य पतकराव, विठ्ठल शिंदे, शिरीष कारेकर, महाराष्ट्राचे महागायक श्री ज्ञानेश्वर मेश्राम या मान्यवरांनी आवर्जुन उपस्थिती दर्शविली होती.
मोठ्या संख्येने आळंदीकर ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून तब्बल 307 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सर्व आजी माजी नगरसेवक व स्वराज ग्रुप चे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.याबाबत माहिती चारुदत्त रंधवे यांनी दिली.