Mumbai : भाजप शिवसेनेचे सरकार हाच एकमेव पर्याय- शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे टाळायचे असेल तर भाजप शिवसेना युतीचे सरकार हाच एकमेव पर्याय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. जनतेने आम्हाला विरोधी पक्ष बनण्याची सुसंधी दिली आहे. त्यामुळे जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला राज्यातील जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला असून आम्हाला विरोधी पक्ष बनण्याची सुसंधी दिली आहे.भाजप आणि शिवसेनेने निर्माण झालेल्या पेचावर लवकरात लवकर मार्ग काढून राज्यात सरकार स्थापन करावे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला आहे.

भाजप आणि शिवसेना गेली २५ वर्षे एकत्र राहिलेले पक्ष असून दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध पक्षात बसण्याचाच निर्णय लोकांनी दिला आहे. आम्ही व काँग्रेस शंभरच्या पुढे जात नाही, त्यामुळे आमचे सरकार बानू शकत नाही त्यामुळे आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.