Mumbai : VVS लक्ष्मण म्हणाला ‘या’ कारणासाठी रोहीत शर्मा IPLचा सर्वात यशस्वी कर्णधार

VVS Laxman said that for this reason Rohit Sharma is the most successful captain of IPL

एमपीसी न्यूज – भारताचा माजी फलंदाज VVS लक्ष्मणने रोहितच्या खेळाचं कौतुक करत IPL मधील तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरण्यामागचं कारण सांगितलं आहे.

‘स्टार स्पोर्ट्स’ या खेळासंबधित चॅनलला दिलेल्या मुलाखतीत VVS लक्ष्मण याने हे कारण सांगितले. लक्ष्मण म्हणाला, रोहित डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना सर्वात प्रथम नेतृत्व कौशल्य निर्माण झालं. पहिल्या वर्षी तो संघात आला, तेव्हा तो तुलनेने नवीन होता.

तरीही मधल्या फळीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. सुरुवातीच्या हंगामात डेक्कन चार्जर्सची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. मात्र, रोहितने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. प्रत्येक सामन्यागणिक त्याचा आत्मविश्वास वाढत जातो.

लक्ष्मण पुढे म्हणाला, रोहित ज्या पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांना विश्वास देतो, गोलंदाजांना मार्गदर्शन करतो हे पाहण्यासारखं असतं. पण यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तो खडतर काळात स्वतःवर दबाव येऊ देत नाही. याच कारणामुळे तो IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे.

दडपणातही शांत राहून उत्तमरित्या परिस्थिती सांभाळण्याची क्षमता रोहित शर्माकडे आहे म्हणूनच तो IPL सर्वोत्तम कर्णधार आहे, असे गौरवोद्गार भारताचा माजी फलंदाज VVS लक्ष्मणने काढले आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा ‘IPL’चे विजेतेपद मिळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.