Pimpri: मराठी शब्द वापरून भाषेचा गौरव करा- अरुण बोऱ्हाडे
शाहूनगर येथील श्री. शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने (Pimpri) “मराठी भाषा गौरव दिना”च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे , माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे हे उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. राजाराम वंजारी व राजेंद्र पगारे यांनी स्वागत केले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे “मायमराठीचा जागर” हे कविसंमेलन कवींच्या उपस्थितीत संपन्न झाले.बाबू डिसूझा, सीमा गांधी, आय. के. शेख, सविता इंगळे, प्रदीप गांधलीकर, वंदना ईण्णांनी, मानसी चिटणीस,माधुरी विधाटे, सुनंदा शिंगनाथ, हेमंत जोशी, वर्षा बालगोपाल, माधुरी डिसूझा यांनी उत्तमोत्तम रचना सादर करून उपास्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मातृगंध संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्तरावर आयोजित निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन निबंधांचे अभिवाचन करण्यात आले. अभिवाचनात मातृगंध संस्थेच्या अध्यक्षा निलाक्षी काळे-सालके, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उज्वला केळकर व मनीषा पाटील यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन भरत गायकवाड, नरेंद्र जयसिंगपूरे, दयानंद कांबळे, अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ यांनी केले.सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. आभार प्रदर्शन राजाराम रायकर यांनी केले.