Pimpri : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च करुनही पादचारी रस्त्यावरच!

एमपीसी न्यूज – शहरातील सुस्थितीतील (Pimpri) रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला असून, पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही पादचारी रस्त्यावरच असल्याचे दिसून येत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, वीजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचाऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाच्या नूतन वास्तुचे बुधवारी भूमिपूजन

अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल (Pimpri) होत नसल्याचे चित्र आहे. नव्या संकल्पनेमुळे पादचारी, सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळणार आहे. त्यामुळे पायी, सायकलने ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. वायू, ध्वनिप्रदूषणात घट होणार आहे ही संकल्पना मोडीत निघत असल्याचे दिसून येत आहे.

पदपथावरील अतिक्रमणे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून हटविण्यासाठी विशेष पथक तयार केले असून संबंधित पथक नियमित कारवाई करीत नाही. कारवाई केल्यानंतर सुद्धा काही तासातच पुन्हा जसे ते परिस्थिती असते. आकुर्डी चिखली रोड चिखलीला जोडणारा एकमेव रस्ता असून प्रचंड प्रमाणात वाहतूक असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले असून पादचाऱ्यासह वाहन चालकांना सुद्धा अनेक कसरत ती करत प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघात सुद्धा होतात. आकुर्डी चिखली रोडवरील पदपथावर झालेला अतिक्रमण व रहिवासी गाळ्यांचे रूपांतर अनधिकृत पणे व्यावसायिक गळ्यामध्ये केल्यामुळे सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

पादचारी व प्रवाशांना ज्यांच्यामुळे त्रास होतो या सर्व संबंधितावर गुन्हे दाखल करत कडक करावी करावे अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडे केली आहे. परंतु प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे भविष्यात नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.