Pune : महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त पुण्यात होणार 20 हजार किलोची मिसळ

एमपीसी न्यूज – क्रांतीसूर्य  महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ( Pune ) दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून तब्बल वीस हजार किलोची मिसळ बनविण्यात येणार आहे. अयोध्येत तब्बल 7 हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर 20 हजार किलोची मिसळ बनविणार आहेत.क्रांतीसूर्य  महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ( Pune ) दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. 

दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक 11 आणि 14 एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील  महात्मा जोतीबा फुले वाडा आणि  पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आहे, अशी माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली.

 

Chinchwad : संसार हा बुद्धिबळाचा पट – डॉ. संजय उपाध्ये

गुरुवारी (दि.11) क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले वाडा येथे 10 हजार किलो मिसळ आणि दिनांक 14 एप्रिल सकाळी 7 पासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे 10 हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून तब्बल 20 हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. पुणेकरांनी महात्मा फुले वाड्यात गुरुवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात आपल्या सोयीने कधीही येऊन मोफत मिसळीच्या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

20 हजार किलो मिसळ करण्याकरिता लागणार भव्य कढई व हजारो किलो साहित्य

मिसळ तयार करण्याकरिता 15 बाय 15 फूट आकारातील भव्य कढाई वापरण्यात येणार आहे. कढईची उंची 6.5 फूट असून 2500 किलो वजन आहे. पोलाद, तांबे आणि भक्कम स्टिलचा वापर करुन ही कढई साकारण्यात आली असून झाकणही मोठे आहे. अयोध्येतील विश्वविक्रमानंतर थेट पुण्यातील या उपक्रमाकरिता ही कढई वापरण्यात येणार आहे.

उपक्रमामध्ये 20 हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी 2 हजार किलो, कांदा 1600 किलो, आलं 400 किलो, लसूण 400 किलो, तेल 1400 किलो, मिसळ मसाला 280 किलो, लाल मिरची पावडर 80 किलो, हळद पावडर 80 किलो, मीठ 100 किलो, खोबरा कीस 280 किलो, तमाल पत्र 14 किलो, फरसाण 5 हजार किलो, पाणी 2 हजार लिटर, कोथिंबीर 250, लिंबू 2 हजार नग जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात येणार आहे. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश 1 लाख, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास 1 लाख यांसह 1 हजार किलो दही व स्लाईड ब्रेड 3 लाख नग असे साहित्य वापरण्यात येणार ( Pune ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.