ज्या दिवशी घटनेला हात लावाल, त्या दिवशी अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज -उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये जाहीर सभा घेतली (Uddhav Thackeray)आहे. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी सरकारचा घटना बदलण्याचा मनसुबा असल्याचं ते म्हणाले.

तुम्ही घटनेला हात लावून पाहा. ज्या दिवशी घटनेला हात लावण्याचा प्रयत्न (Uddhav Thackeray)करतील त्या दिवशी अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही. देशातील लोकं काय गुरंढोरं आहेत का? एकदा मूर्ख बनवाल. काही जणांना सदैव मूर्ख बनवाल. पण सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. कारण जनता आता जागी झाली आहे.

प्रत्येकवेळी निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लीम दंगे लावले जात आहेत. आता त्यांनी नवीन काढलं. मी बातम्या वाचतो आणि बघतो. इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल म्हणून सांगतात. अरे आमच्यापैकी कोणी तरी न बोलावता नवाज शरीफचा केक खाऊन आला का?. आमच्यापैकी कोणी तरी जीनाच्या कबरीवर जाऊन आला का. आपल्यात भांडणं लावायचा हा प्रकार आहे.अस ही ठाकरे म्हणाले.

Chinchwad : ‘मोका पॅटर्न’; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे मोका कारवाईचे अर्धशतक

ते पुढे म्हणाले ,सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. जाऊन दाखव. मी कोकणात गेलो. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील.

अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना आहे. मग मी त्यांना काय बोललो… काल जे बोललो ते सांगतो. जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहे. हे माझे वैभव आहे. ही माझी संपत्ती आहे. बी बियाणे आणि अवजारांवरील जीएसटी माफ करेल. सरकार आल्यावर.

अमित शाह तुमच्या लाज असेल हिंमत तर नाही. तर जनतेच्या प्रश्नावर बोला. धाराशीवला कधी देणार पाणी. मोदीजी तुम्ही तुमच्या दहा वर्षातील कामे जनतेसमोर ठेवा. मी अडीच वर्षातील कामे ठेवतो. तुम्ही जिंकला तर मी घरी बसणार. ईडी कारवाया करून ज्यांनी आमच्या लोकांना सतावलं. त्याचा हिशोब व्याजासह परत केल्याशिवाय राहणार नाही.असं ही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.