ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांचे प्रश्न लोकसहभागाने सुटतील – डॉ. संजय कप्तान
एमपीसी न्यूज – ”ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबध्द रीतीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. लोकसहभागाने बरेच प्रश्न सुटतील.” असे मत डॉ. संजय कप्तान यांनी व्यक्त केले.
मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत वाणिज्य विभागाच्या वतीने , 17 व 18 फेब्रुवारीला दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले याच्या आहे. त्यावेळी”ग्रामीण भागातील औद्योगिक विकासातील आव्हाने” या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीजभाषक डॉ. एस. व्ही. कडव्हेकर , सत्राचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बाळसराफ, संस्थेचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्रा. वसंत पवार व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या स्नेहल बाळसराफ व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व चर्चासत्राचे आयोजक प्रा. श्रीकांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. एस. व्ही. कडव्हेकर म्हणाले, ”ग्रामीण भागात औद्योगिकरण वेगाने होऊ शकते कारण तिथे विचारांचा भ्रष्टाचार तुलनेनी कमी आहे. गरज आहे व्यावसायिक दृष्टिकोन बाऴगण्याची.” अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळसराफ यांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.
पुढील सत्रांमध्ये अर्चना आहेर , डॉ. अश्विनी सोवनी या प्रमुख वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जे. डी. टाकळकर व डॉ. ए. एम. अग्रवाल सत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रा. श्रीकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किसन पाटील व प्रा. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनया केसकर यांनी आभार मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचा-यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.
{fcomment}