एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चौथा लॉकडाउन सुरु झाल्यापासून मूळगावी गेलेले अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात परतत आहेत. शहरात येणा-या अनेक जणांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाद होत आहेत. त्यासाठी बाहेरुन शहरात येणा-या नागरिकांबाबत नियमावली जाहीर करुन त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.