Chinchwad : विकासाच्या अगोदर पर्यावरण संवर्धन गरजेचे; पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमकडून नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. निवडणुकीला सामोरे जात (Chinchwad)असताना सर्व पक्षाकडून नागरिकांना विविध आश्वासने दिली जात आहेत. त्यातच पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम कडून नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. विकास करत असताना तो शाश्वत असावा, तसेच विकासाच्या अगोदर पर्यावरणाचे संवर्धन करावे असा सूर या जाहीरनाम्यातून व्यक्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे राजीव भावसार, तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान, (Chinchwad)गणेश बोरा, आनंद पानसे यांनी पत्रकार परिषदेत नागरिकांचा जाहीरनामा जाहीर केला. पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम कडून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हा नागरिकांचा जाहीरनामा दिला जाणार आहे. त्याचबरोबर जो उमेदवार निवडून येईल त्याने या जाहीरनाम्यातील सर्वसामान्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी केली जाणार आहे.
फोरमने आपल्या जाहीरनाम्यात ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय धोरण राबविण्याची मागणी केली आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसह असंघटित घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र पेन्शन योजना सुरू करावी. शहरातील पदपथांवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावे. अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध करावा. प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच केवळ स्मार्ट सिटीच्या मागे न लागता ती शहरे राहण्याजोगी असायला हवी.
नदी सुधार प्रकल्प सक्षमपणे राबवावा. एसटीपी आणि ईटीपी कायम जरूर राहण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर सध्या बहुतांश स्थानकांवर कामे सुरू आहेत. दरम्यान पुणे लोणावळा मार्गाचे चौपदरीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. हे काम सुरू झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या कामांमधील बहुतांश भाग पाडावा लागणार आहे. ही सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आहे. त्यामुळे भविष्यातील योजनांचा विचार करून पावले उचलायला हवीत.

Nigdi: अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली आहे. मात्र मेट्रो स्थानकांवर वाहनांच्या पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे प्रत्येक मेट्रो स्टेशनवर पार्किंगची सोय करायला हवी. मेट्रोची फिडर सेवा सक्षम करावी. मेट्रोचे जाळे विस्तारावे. अर्धवट मेट्रो म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून रखडलेला पवना बंद जलवाहिनीचा प्रकल्प राबविण्याबाबत लवकर निर्णय व्हावा. निवडून येणाऱ्या उमेदवाराने आपल्या मतदारसंघातील प्रत्येक भागात जाऊन जनसंवाद सभा घ्याव्यात. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. कचरा व्यवस्थापनासाठी पुढील अनेक वर्षांचा विचार करून धोरण राबवावे, असेही जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.