Alandi News : केमिकल कंपन्यावर कारवाई होते फक्त कागदावरच- विठ्ठल शिंदे
एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी (Alandi News) नदी काठच्या गावातून सोडत असलेल्या सांडपाण्यासह कारखान्यातील केमिकल युक्त मैलमिश्रित पाण्या वर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने आज (दि.11एप्रिल) केमिकलयुक्त पाण्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळलेली दिसून आली.
विठ्ठल शिंदे यांच्याशी संपर्क केला असता इंद्रायणी नदी प्रदूषणा बाबत त्यांनी दुसरा व्हिडिओ दिला.त्यामध्ये ते म्हणाले प्रदूषण मंडळ फक्त कागदावर कारवाई करते. नावाला फक्त पेपर देण्या पुरते.मात्र कृती शून्य आहे.कारण कारवाई जर झाली असती तर निश्चितच पुन्हा केमिकल आले नसते.आणि हे बंद होण्याची आणि करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही असे जाणवू लागले आहे.
शासकीय कार्यकर्ते नेमके काय करतात? कळत नाहीत. कंपन्यांवर कठोर कारवाई करा.अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच यामध्ये उपोषणाचाही इशारा त्यांनी दिला आहे.