Cricket News : खूषखबर…पुण्यात होणार तीन वनडे सामने, ‘हा’ संघ भिडणार टीम इंडियाला!

एमपीसी न्यूज : अखेर भारतीय क्रिकेट अखेर सुरू होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणारी बहुचर्चित कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात खेळवण्यात येईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाने संयुक्तरीत्या याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यातील संपूर्ण वनडे मालिकाच पुण्यात खेळली जाणार आहेत.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळविण्याचे नियोजित होते. मात्र, कोरोना महामारीमुळे हा दौरा युएईमध्ये खेळवला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आता बीसीसीआय व ईसीबीच्या सचिवांनी अधिकृतपणे हा दौरा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

असा असेल इंग्लंडचा भारत दौरा…

कसोटी मालिका…

पहिला कसोटी सामना- 5 ते 9 फेब्रुवारी 2021 (चेन्नई)
दुसरा कसोटी सामना- 13 ते 7 फेब्रुवारी 2021 (चेन्नई)
तिसरा कसोटी सामना- 24 ते 28 फेब्रुवारी 2021 (अहमदाबाद)
चौथा कसोटी सामना- 4 ते 8 मार्च 2021 (अहमदाबाद)

टी20 मालिका….

पहिला टी20 सामना- 12 मार्च 2021 (अहमदाबाद
दुसरा टी20 सामना- 14 मार्च 2021 (अहमदाबाद)
तिसरा टी20 सामना- 16 मार्च 2021 (अहमदाबाद)
चौथा टी20 सामना- 18 मार्च 2021 (अहमदाबाद)
पाचवा टी20 सामना- 20 मार्च 2021 (अहमदाबाद)

वनडे मालिका….

पहिला वनडे सामना- 23 मार्च 2021 (पुणे)
दुसरा वनडे सामना- 26 मार्च 2021 (पुणे)
तिसरा वनडे सामना- 28 मार्च 2021 (पुणे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.