Pimpri : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी- गजानन बाबर
एमपीसी न्यूज – एकीकडे ‘कोरोना’चे धैमान सुरू असताना पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तातडीने पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
देशभरात कोरणा सारख्या साथीचा प्रादुर्भाव आहे तसेच आपल्या देशामध्ये राज्यामध्ये मंदीचे सावट आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये 25 तारखेला झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपल्या विभागामार्फत अधिकाऱ्यांना पिकांची पाहणी करण्यास सांगून आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गजानन बाबर यांनी केली आहे.