Pimpri : आस घनांच्या आगमनाची . . . . .
अमोल वाजगे
एमपीसी न्यूज – उन्हाळा संपला, आता पावसाळा सुरु झाला. ऋतू बदलला. मात्र, पावसाने अजून सुरुवात केली नाही. मागील दोन दिवसात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण, संपूर्ण उन्हाळ्यात व्याकुळ झालेला जीव एवढ्या पावसाने शांत झाला नाही. माणसांसह, पशू पक्ष्यांना देखील पावसाच्या आगमनाची आस लागली आहे. दिवसभर ढग भरून येत आहेत. सूर्य काही काळ ढगांच्या आड झाकला जात आहे. पण, घारीरातून घामाच्या धारा थांबण्याचे नाव घेत नाहीत. काहीजण भरलेल्या ढगांकडे बघून त्याच्या येण्याची वाट पाहतात. पण, काहीजण मात्र कुठेतरी पाणीसाठा शोधून त्यात डुंबून जातात. अशीच काही छायाचित्रे……