Pune News: संजय राऊत इशाऱ्यावर काम करतात, त्यांना मातोश्रीचा पाया डळमळीत करायचा का ? 

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर टीका करतात  त्यांना मातोश्री डळमळीत करायची का? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना मातोश्रीचा पाया उखडायचा आहे का? असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली. 

बालेवाडी येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले,  सामना वृत्तपत्रातून भाजपच्या नेत्याबद्दल वेगवेगळ्या भाषेतून टीका होत आहे. त्यावर रश्मी वहिनी सामना च्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परबांना संपादक करा.

https://www.youtube.com/watch?v=F4t2TM2LO7k&t=3s

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सध्या जे काही चाललय त्याबाबत अँक्शनला रिएक्शन होतच राहणार असे म्हणावे लागेल. सगळ्यांना कोणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाहीये. अशावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे  मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं. पण ते कसे बोलवणार?
राणे संजय राऊत यांच्यावर रोज नवीन  ट्विट करत आहेत.  त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले ,राणेंच्या ट्विट बाबत मला माहिती नाही. परंतु ते केंद्रीय मंत्री आहेत. माहितीच्या आधारेच बोलतात.सध्या राज्यात नगरसेवकांची फोडाफोडी सुरू आहे. महाविकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत ते काँग्रेस आणि शिवसेनेला कटपुटली सारखे नाचवताहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=q2Od3eJ7juI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.