Pune : 294 सॅम्पलपैकी 15 पॉझिटिव्ह तर, 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी -डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – आतापर्यंत 294 सॅम्पल हाती आली आहेत. त्यातील 15 पॉझिटिव्ह आहेत. तर बाकी सर्व निगेटिव्ह आहेत. 15 सॅम्पलचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. काल जे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यातील चार रुग्ण परदेशात गेले नव्हते. तर ते याआधी ‘कोरोना’ची लागण झालेल्यांच्या संपर्कात आले होते. ही चिंतेची बाब आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले, लोकांनी आपली घर सोडू नये, घराबाहेर पडू नये. काही भागात कलम 144 लावण्याचा विचार सुरू आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेले सर्व उपाय अमलात आणण्यात येणार आहेत. हॉस्टेल रिकामे करण्यासाठी अजून कोणतीही सूचना नाही. ज्या ज्या ठिकाणी परीक्षा सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्यासाठी कोणतेही महाविद्यालय बंधन टाकणार नाही. याच्या सूचना आम्ही संबंधित महाविद्यालयाना देणार आहोत. ज्या रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना कोणीही त्रास देऊ नये. रुगणांच्या नातेवाईकांनीही घराबाहेर पडू नये. एकाच्या चुकीमुळे संपूर्ण सोसायटीला वेठीस धरले जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही.

अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्या तर असा व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परदेशातून आलेले व्यक्तीनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. अशा व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर पडू नये. काल पॉझिटिव्ह आलेल्या चार व्यक्तीमुळे खूप बदल झाला आहे.

11 ऑफिसरचा एक कोअर ग्रुप तयार करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह 11 अधिकारी आहेत. कुठल्याही परिस्थितीत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत, त्यांनी स्वतःला बंधन घालून शहरात फिरणे टाळावे. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. दहावी-बारावी अथवा ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यांनी स्वतःला बंधन घालून शहरात फिरणे टाळावे. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्णयानुसार 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. याव्यतिरिक्त ही परिस्थिती लक्षात घेता मनुष्यबळ आणि इतर जी मदत लागेल. त्यासाठी आवश्यक तो फंड देण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

कोरोनाची लागण झालेले अथवा त्यांच्या संपर्कात आलेले किती रुग्ण बाहेर फिरतात? याची कल्पना प्रशासनाला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे..काल रात्री मी स्वतः एक एफआयआर दाखल केली आहे. इथे कोरोनाचे रुग्ण झाल्याची माहिती एकाने दिली होती. त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे लक्षात येताच त्याचा नंबर आणि त्याने पाठवलेला मेसेज याद्वारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे यापुढेही खोट्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल.

कलबुर्गी येथे एकाचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला होता. तेथे काही विदर्भातील विद्यार्थी अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना काल सोलापूर येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. यात कोणीही पॉझिटिव्ह नाही. त्या सर्वांना विदर्भातील त्यांच्या घरी सोडवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण पुणे विभागात (पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा) आवश्यक त्या औषधाचा साठा करण्यात आला आहे, असेही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.