Pune : परिचारिकांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही : नीता अहिरराव
डॉ. कल्पना बलिवंत म्हणाल्या की, रुग्ण आणि नर्स यांच्यामध्ये निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते. कोणत्याही रुग्णाला आपल्याला लवकरात लवकर बरे व्हावे असे वाटत असते आणि त्यासाठी रुग्णालयातील सर्व स्टाफ मनापासून रुग्णांची सेवा तत्परतेने बजावत असतो. चोवीस तास रुग्णालयात थांबून परिचारिका रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा पुरवित असतात.