Soldier Helps Chinese: रस्ता चुकलेल्या चिनी नागरिकांना भारतीय सैनिकांनी दिला मदतीचा हात

चिनी नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे लक्षात येताच भारतीय सैनिक त्यांच्या मदतीला धावले. उंच जागा आणि कठीण हवामान परिस्थितीत त्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक तातडीने त्याठिकाणी ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे घेऊन पोहोचले.

एमपीसी न्यूज – गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन मधील तणाव वाढला असून दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमा वादावर चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी दोन्ही देशात वारंवार चर्चा केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सिक्किममध्ये रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैनिकांनी मदतीचा हात दिला.

उत्तर सिक्कीमच्या 17,500 फूट उंचीच्या पठार भागात 3 सप्टेंबर रोजी तीन चिनी नागरिक रस्ता चुकले. ज्यामध्ये दोन पुरुष व एक महिला होती. उणे तापमान असलेल्या या भागात अडकलेल्या त्या तीन चिनी नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे लक्षात येताच भारतीय सैनिक त्यांच्या मदतीला धावले.

उंच जागा आणि कठीण हवामान परिस्थितीत त्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक तातडीने त्याठिकाणी ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे घेऊन पोहोचले.

भारतीय सैन्याने त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले, त्यानंतर ते परत गेले. तातडीने मदत केल्याबद्दल, चिनी नागरिकांनी भारत आणि भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.