Talegaon : विनाकारण तिघांना मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – विनाकारण तीन जणांना मारहाण करणाऱ्या चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.
धनराज शोभा जाधव (वय 50), बद्रीनाथ गणपत राठोड (वय 50), समाधान बद्रीनाथ राठोड (वय 22), जयराम जाधव (वय 27, सर्व रा. कासारखेडा, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उमेश विनोद राठोड (वय 16, रा. दारुंब्रे शिवार, ता. मावळ. मूळ रा. करगाव, ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे आई-वडील दारुंब्रे येथील साखर कारखाना येथे बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी काठ्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. यामध्ये तिघेही जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.