Talegaon : उर्से टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांची मोटार चालकासह कुटूंबीयांना मारहाण

एमपीसी न्यूज –  टोल नाक्यावर पावती फाडण्यावरून झालेल्या वादात टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांच्या दहा जणांच्या टोळक्याने मोटार चालकासह त्याच्या कुटूंबीयांना बेदम मारहाण केली. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर उर्से टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

याप्रकरणी बाबासाहेब यादव (वय 43, रा. सागरदिप सोसायटी, नेरूळ, मुंबई) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल बराळू गोसावी, सदानंद जोशी यांच्यासह सात ते आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव हे कुटंबियांसह मोटारीतून पुण्याकडे येत होते. उर्से टोलनाक्यावर त्यांना टोल भरण्यासाठी अडविण्यात आले. यादव यांनी आपण खालापूर टोलनाक्यावर टोल भरला आहे, असे सांगितले. त्याची पावतीही आपल्याकडे असल्याचे  म्हणत त्यांनी आपल्या खात्यातून पैसे कट झाल्याचेही सांगितले. मात्र, यादव यांचे काहीही ऐकून न घेता टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी यादव यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना बेदम मारहाण केली. फौजदार नागरगोजे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.