Wakad News : वाहतूक कोंडीबाबत नागरिक, पोलीस लोकप्रतिनिधींची बैठक

एमपीसी न्यूज – वाकड येथील दत्तमंदिर व अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक समस्येवर उपाय योजना करण्यासाठी रहिवाशी, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कार्यालयात शनिवारी (दि.7) बैठक संपन्न झाली. (Wakad News) या समस्येला सर्वस्वी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत त्यांच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी ताशेरे ओढले. यापुढे तात्पुरता व प्रायोगिक तत्वावर पी 1, पी 2 पार्किंग व्यवस्था करण्यासह प्रत्येकाने स्वतःला स्वयंशिस्त लावण्यावर बैठकीत एकमत झाले.

या बैठकीला राहुल कलाटे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने, वाकड वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक नितीन अंभोरे, दीपक गायकवाड यांच्यासह विविध गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध अतिक्रमणांमुळे रस्त्यात होणाऱ्या बेशिस्त अन बेकायदा पार्किंगने विकेंडला रस्ते जाम होतात. त्याचा सर्वांनाच मोठा मनःस्ताप सहन करावा लागतो.

सर्व सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे, नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी जेणे करुन नियम मोडण्याची भीती लोकांत निर्माण होईल. एकेरी वाहतूक करावी, पार्किंग क्षेत्रांची निर्मिती करावी, पी-वन, पी-टू पार्किंग व्यवस्था राबवावी, पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, पदपथावरील आठवडे बाजार हटवावे, अतिक्रमण विभागाने देखील कारवाईत कसूर न करता सातत्याने कारवाई करावी असे उपाय  काही नागरिकांनी सुचविले.

Pune News : ‘जी-20’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी – पालकमंत्री

राहुल कलाटे म्हणाले, ”ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेला माझ्या कार्यालयाकडून यापूर्वीच पत्रव्यवहार झाला आहे. बैठकीत नागरिकांच्या समस्या, तक्रारी समजून घेतल्या.(Wakad News) त्यांनी सुचविलेले उपाय, सलले यांना विचारत घेतले जाईल. परिसरातील रस्त्यांची निर्मिती होताना अशा समस्या काही दिवस उद्भवतात त्यामुळे आता किमान दत्त मंदिर रस्ता होईपर्यंत महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रायोगिक तत्वावर पी1, पी2 व्यवस्था राबविण्यात येईल”.

”वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सुनिल पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी, रहिवाशी, महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना एकत्र घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणायला लावल्या जातील. तसेच सीसी टीव्ही कॅमेरे, सिग्नल सुरू करून वाहतूक कोंडी सोडविली जाईल. त्यासाठी राहिवाशांचा देखील सहभाग आणि प्रतिसाद म्हत्वाचा असल्याचे” वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक नितीन अंभोरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.