Wakad : भिंतीतून पाणी गळत असल्याने शेजाऱ्यांमध्ये वाद

एमपीसी न्यूज – भिंतीतून पाणी गळत असल्याच्या किरकोळ वादातून तिघांनी मिळून शेजारी राहणाऱ्या एका मुलीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 30) सकाळी सहाच्या सुमारास दगडू पाटीलनगर, थेरगाव येथे घडली.

वंदना वैजिनाथ पवळ (वय 50, रा. दगडूपाटील नगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मेहबूब शेख, मयताफ शेख, अल्ताफ शेख ( सर्व रा. दगडूपाटील नगर, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवळ आणि आरोपी शेख हे शेजारी आहेत. या दोन्ही कुटुंबीयांमध्ये भिंतीतून पाणी गळत असल्याच्या कारणावरून भांडण सुरु आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी आरोपी पवळ यांच्या घरात घुसले. तुमची भिंत नीट करून घ्या, असे म्हणून आरोपींनी पवळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी पवळ यांच्या मुलीने आरोपींना शिवीगाळ करण्यापासून रोखले. याचा राग आल्याने आरोपींनी मुलीला मारहाण केली. तसेच तोंडावर वीट मारून मुलीला जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.