Pune News : अटलजींनी काय सांगितलं होतं, एवढ्या लवकर विसरलात; नीलम गोऱ्हे यांचा भाजपला सवाल

एमपीसी न्यूज – अटल बिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म पाळा असे सांगितले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीही मोदींना जबाबदारी तशीच ठेवा असे सांगितले होते. मात्र एवढ्या लवकर तुम्ही इतिहास विसरला अशी खंत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवारी नीलम गोऱ्हे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी बोलत असताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले.

नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलत असताना अंबादास दानवे यांचे कौतुक करत असतानाच भाजपवर टीका केली.यावेळी त्यांनी भाजपकडून अनेक लोकांना धमकावल जात असल्याचा आरोप केला. या संदर्भातले अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, अमित शहा यांना मुंबईत येऊन बाजू मांडावी लागत आहे यातच शिवसेनेचा विजय आहे.राज्यातल्या नेतृत्वात तेवढी धमक नाही त्यामुळेच अमित शहा यांना मुंबईत यावे लागले.मुंबई महापालिकेच्या तयारीसाठी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला यावे लागते.त्यामुळे अमित शहा यांना देखील खरे शिवसेना कोणती हे चांगले माहीत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.