Pune News : मुंबई-बंगळूर महामार्गावर अपघात, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मुंबई-बंगळुरू बायपास रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एकजन जखमी झाला आहे. सुभाष रामलाल महातो (वय २४, रा. उन्नतीनगर, साईनगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार पी. आर. गोरे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऋषीकुमार हा जखमी झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॠषीकुमार आणि सुभाष महातो मूळचे बिहारचे आहेत. दोघेजण विद्युत विषयक कामे करणाऱ्या ठेकेदाराकडे कामाला होते. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून बाह्यवळण मार्गावरून कात्रजकडे निघाले होते.

आरएमडी महाविद्यालयाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी ॠषीकुमार रस्त्याच्या कडेला पडला. सहप्रवासी सुभाष गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. उपचारांपूर्वीच सुभाष याचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.