Bhosari : भोसरी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला -आमदार महेश लांडगे

चिखलीत भव्य मेळावा, महिलांची मोठ्या संख्येने गर्दी

एमपीसी न्यूज- भोसरी मतदारसंघातील गरजू, आजारी रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटीची मदत केली. मोशीतील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प केला. संत पीठासाठी जागा मिळवून त्याचे काम सुरु केले. पुणे-आळंदी रस्ता केला. अवैध बांधकामाच्या एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला. समाविष्ट गावातील नारिकांची तहान भागविण्यासाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत असून त्यातील 100 एमएलडी पाणी केवळ चार गावांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून चिखलीग्रामस्थांच्या वतीने परिसरातील कार्यकर्त्यांचा इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात भव्य विजयी संकल्प मेळावा गुरुवारी (दि.27) पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार लांडगे बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव यांच्यासह चिखलीगावातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, पंडीत मोरे, रोहिदास मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “भोसरी मतदारसंघातील गरजू, आजारी रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटीची मदत केली. मोशीच्या कचरा डेपोत 2017 पासून कचरा जमा होत नाही. गेल्या 20 वर्षांपासून जमा होणा-या कच-याचे काय केले. केवळ कच-याचे डोंगर उभे केले आहेत. कच-यावर प्रक्रिया करण्याचे सूचले नाही. आम्ही ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प केला. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात. आम्ही पण कच-याचे डोंगर उभे करायचे का? असा खडा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणला. संत पीठासाठी जागा मिळवून त्याचे काम सुरु केले. पुणे-आळंदी रस्ता केला. शब्द दिला तो पूर्ण केला आहे. 2014 ला सांगितलेले प्रश्न मार्गी लावले आहे”

अवैध बांधकामाच्या एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला. ज्यांनी शास्तीकर आणला ते आज आम्हाला काय केले विचारतात. समाविष्ट गावात अनेक वर्षांपासून पाण्याची ओरड असताना पाणी आणण्याचे नियोजन केले नाही. आम्ही आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणत आहोत. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील 100 एमएलडी पाणी केवळ चार गावासाठी आहे. काम पूर्ण झाल्यावर समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी खात्री आहे, असेही ते म्हणाले.

अगोदरच्या पुढा-यांनी घराघरात, गावागावात भांडणे लावली. दोन गट पाडले. पण आज गावातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते एका व्यासपीठावर येतात. त्यामुळे ख-या अर्थाने विजयी झालेसारखे वाटते. राजकारणाने लोक जवळ येत नाहीत. प्रेमाने आणि आपुलकीने जवळ येतात. चिखलीगावाला राजकाणाची नसून सांप्रादयाची परंपरा आहे. सांप्रादय रुचेल असे गावाच्या एकत्रीकरणाने दिसत आहे. एकही विरोधकाच्या बाबतीत चुकीचा शब्द काढला नाही. राजकाराणाची नवीन वाटचाल सुरु आहे. यापूर्वी निवडणूक आली की घरातील महिलांना ताण असायचा. पण, आम्ही भोसरीत आदरयुक्त राजकारण चालू केले आहे. भोसरी मतदारसंघात निवडून आलेले नगरसेवक ध्येयाने वेडे झाले आहेत. जबाबादारी पार पाडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहे, असे लांडगे म्हणाले.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ” समाविष्ट गावांना न्याय दिला. च-होली, मोशी, डुडूळगावाचा विकास केला. व्हिजन 20-20 अंतर्गत पुढील 25 वर्षांचे नियोजन केले आहे. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र चिखलीत सुरु केले आहे. चिखलीला संताची परंपरा असून या गावात भव्य असे संत पीठ करण्यात येत आहे”

सभापती गीताराम मोरे म्हणाले, “आमदार महेश लांडगे कार्यकर्त्यांना ताकद देतात. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. विरोधकांना देखील प्रश्न पडतो दादांच्या मागे कार्यकर्त्यांचे बळ कसे आहे. चिखलीकरांना काहीच कमी पडू दिले नाही. कामाचा डोंगर उभा केला आहे. चिखलीकरांना महत्वाची पदे दिली आहेत. सामान्य कुटुंबातील चिखलीचा महापौर केले. त्यामुळे चिखलीतील नागरिक दादांना काही कमी पडून देणार नाहीत. चिखलीला कुटुंब म्हणून पाहिले”

माजी उपसरपंच यशवंत साने म्हणाले, “हा मेळावा चिखलीच्या इतिहासात लिहून ठेवणारा आहे. जुनी आणि नवीन कार्यकर्त्यांचा सर्वांचा मिलाफ झाला आहे. ज्येष्ठ नागरिक संघासाठी दादांनी कार्यालय दिले आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक दादांसोबत आहेत. युवा कार्यकर्ते तुकाराम मोरे, चिखलीकरांसाठी भरपूर दिले आहे. आता आमची वेळ आहे. आम्ही सव्वा लाखाच्या मताने निवडून देणार आहोत. आपल्यासमोर उमेदवारच नाही. त्यामुळे बिनविरोध निवडून येतील”

जितेंद्र यादव म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन 20-20’ अंतर्गत कामे केली आहेत. भोसरी मतदारसंघाला कुटुंब म्हणून संपुर्ण मतदारसंघात विकासकामे केली आहेत. पाच वर्षांत लावलाय जोर,,महेशदादा आमदार वन्समोर असे सांगत स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, खूप अफवा पसरविल्या जातात. अफवांना कोणीही बळी पडू नये. साधना मळेकर म्हणाल्या, धार्मिक ठिकाण असलेल्या चिखली गावात संत पीठ होत आहे. कमानीचे काम केले. पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. विकास पुरुष आमदार सव्वा लाखाच्चा फरकाने निवडून देणार आहोत”

सुरेश म्हेत्रे म्हणाले, “माणुसकी जपणारे आमदार आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठी मदत केली. 2014 ला अपक्ष असताना भोसरीकरांनी 15 हजार मताधिक्याने निवडून दिले होते. विकासाचा पाऊस पाडला आहे. आता सुनामी येणार असून दीड लाख मताच्या फरकाने आमदार महेश लांडगे यांचा विजय निश्चित आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.